१००- अण्णा अष्टेकर पुर्णतः काल्पनिक ® at fwa 81021022 © मकरंद बेहेरे…….
……. ओगल्यांची सुमन, महादेव निवासमधला आणखी एक अॅंटीक पिस होता, घराण्यांतर्गत चालत आलेला आचरटपणाचा कळस, शिरोमणी, मुळात ओगल्यांच्या घराला त्यांच्या एकंदर किळसवाण्या आचरणामुळे वाळीत टाकलं होतं, सगळ्या चाळीने, जेवढे सगळे जीवंत ऐवज होते, ते सगळे काळे कभिन्न, कुणाकुणाला चाळीने टोपण नावं दिली होती, त्यांच्या घरातल्या कर्त्या बाईला हेमा मालिनी, तिच्या मुलाला म्हणजे सुमनच्या भावाला जो काण्या होता त्याला अमिताभ बच्चन, तर सुमनला कमळा बकुळा, सुरूपच्या बहीणीच सुश्राव्याच जरी ती सुमनपेक्षा खूप लहान असली तरी तीला अकाली प्रौढत्व आलं होतं त्यामुळे सुमनचं आणि तीचं चांगलं मेतकूट जमायचं, दोघी एका माळेच्या मणी, थोडक्यात, सर्वार्थाने “सुमारिका!”
…….तर तो काळ होता ८० च्या दशकाचा नुकतंच महादेव निवासमध्ये पहिलं वाहिलं लव्ह मॅरेज पुर्णतः यशस्वी झालं होतं, आणि चाळीतल्या बालभारती ते, कुमारभारती, युवकभारती वाचणार्यांसाठी ते आदर्श ठरलं होतं, बरं मुलगी आमच्या चाळीतली होती आणि, सुमनचा टोकाचा विपर्यास होती, बोल्ड अॅंड ब्युटीफुल. त्यामुळे समकालीन शिंग फुटलेल्या आमच्या पंचक्रोशीतल्या मुला मुलींना एक आदर्श उत्तरपत्रिका ठरली होती जी वाचून प्रत्येक जण प्रेमाचा अभ्यासक्रम सुरू करून त्यात उत्तीर्ण व्हायचा प्रयत्न करत होता काही, यशस्वी ठरत होते तर काही अयशस्वी……. सुमनने तर डायरेक्ट डाॅक्टरीच केली…….
……. शाळेपासूनच अभ्यासात लक्ष नसलेली, तीला बर्याच वाममार्गी कलांमध्ये गती होती. त्यामुळे शाळेतून घरी बसवलेली, पी. एच. डी चा पेपर काॅपी करून नापास झाली. एकतर्फी प्रेम, तो चाळीतला चांगल्या अर्थाने, खर्या अर्थाने “आॅल राऊंडर”, जो कधी तीला वार्याला उभी करत नसे ही त्याच्यावर लाईन मारायची, त्याच्या मागे लागली, त्याच्याशी लगट करायच्या या ना त्या कारणाने संधी शोधायची, पण तो तीला चारा घालायचा नाही, प्रकरण वाढत गेलं, आणि एके दिवशी भावना अनावर होऊन, तीने चाळीत लग्नासाठी तमाशा केला, त्याला आत्महत्येची धमकी दिली, त्याने भर चाळीत तीच्या कानाखाली खणकन वाजवली, प्रकरण दोघांच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचलं, त्याच्या आई-वडिलांना त्याच्यावर विश्वास होता की तो काही वावगं करणार नाही, “निकाल” लागला. तेव्हा तिच्या आई वडीलांनी तीला काय ते विचारलं, ती म्हणाली “हो, तो माझा मानलेला नवरा आहे!”